तुझी आठवण मला रोज तीनदा येते फक्त ऑफिसात घरी आणि या दोन्हींत ये-जा करताना इतर वेळेला तुझा विचारही करत नाही काय सांगू... सध्या आयुष्य इतकं बिझी आहे की ऑफिस आणि घर सोडून इतर कुठे जायला वेळच मिळत नाही!
उद्या सकाळी फोन करतो म्हणालास.. बहुधा सहजच म्हणाला असशील तुझी सकाळ केव्हाच संपली माझी संपूनही बराच वेळ झाला संपली नाहीये ती एकच गोष्ट... माझं अव्याहतपणे तुझी वाट पाहणं! जे लवकर संपावंसं वाटतं तेच सगळ्यात जास्त रेंगाळतं हेच खरं!!
चांदण्यागत तलम मनात खोल झिरपत जाणार्या आवाजात रोज विचारतोस 'कशी आहेस'? तुझ्या पहिल्या शब्दाबरोबरच विरघळत जाणारी मी त्या क्षणी कशी असते हे खरंच कळत नाही तुला?